स्त्री-पुरूष समानतेचे बीज रुजवण्यासाठी व उच्च शिक्षणातील मुलींचा टक्का वाढवण्यासाठी महाविद्यालयांतून राबवण्यात येणारा ‘जागर जाणिवांचा’ या उपक्रमाला राज्यभरातून निम्माच प्रतिसाद मिळाला आहे. ५० टक्के महाविद्यालयांनीच हा उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांची कल्पकता व प्रेरक शक्तीचा वापर करणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
‘जागर जाणिवांचा’ या अभियानाच्या माध्यमातून सर्व विद्याथी-विद्यार्थिनी, शिक्षक आणि महाविद्यालय प्रशासन इत्यादींना त्यांचे महत्त्व पटवून त्यांनी सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग घ्यावा या दृष्टिकोनातून जिल्हा, विद्यापीठ व राज्य स्तरावर महाविद्यालयांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २३ ऑक्टोबर, २०१२ रोजी या संदर्भात आदेश काढले होते. मात्र, महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांपर्यंत हा उपक्रम न पोचल्याने राज्यभरातील केवळ एक हजार महाविद्यालयांनीच यात सहभाग नोंदविल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली. हा उपक्रम राज्यभर विस्तारावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अक्षरा सामाजिक संस्थेच्या नंदिता शहा, माजी सचिव चंद्रा अय्यंगार आदी मान्यवर उपस्थित होते. या अंतर्गत महाविद्यालयाचे मूल्यमापन करण्यासाठी निकष ठरविण्यात आले आहेत. स्त्री-पुरूष समानतेसाठी सूचना करणे, या सूचना अंमलात आणण्यासाठी कार्यपद्धती सुचविणे, महाविद्यालयात होणाऱ्या छेडछाडीमुळे मुलींच्या मनात असलेली भीती व असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी होणारे प्रयत्न आदी निकषांवर हे पारितोषिक दिले जाणार आहे. ८ मार्चला महिला दिनाच्या दिवशी या पारितोषिकांचे वितरण करण्यात येईल.

महाविद्यालय, रद्द केलेल्या जागा आणि नेमके चुकले कुठे?
*  काशीबाई नवले, पुणे (७) – आरक्षणविषयक नियम न पाळणे, खुल्या वर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनीला ओबीसी कोटय़ातून प्रवेश देण्याच्या नावाखाली प्रवेश डावलणे
*  एमआयएमईआर, पुणे (६) – एका विद्यार्थिनीने वैयक्तिक कारणास्तव प्रवेश रद्द केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर महाविद्यालयाने अनुसूचित जमातीतील एका विद्यार्थ्यांला प्रवेश दिला. जागा अचानक रिक्त झाल्यामुळे महाविद्यालयाच्या कॅम्पसवर जो विद्यार्थी उपस्थित होता त्याला प्रवेश देण्यात आला असे महाविद्यालयाचे म्हणणे आहे. पण, हा प्रवेश रात्री १०च्या सुमारास दिला गेला. कार्यालयाची वेळ टळून गेलेली असताना इतक्या रात्री प्रवेश देण्याची गरज काय?
*  इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च, सातारा (३८) – बेटरमेंट मिळाल्याने प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थिनीला शुल्क परताव्याचा (रिफंड) पुढील तारखेचा (पोस्ट डेटेड) धनादेश दिला. पण, बँकेत वेळेत पैसे जमा न झाल्याने ही विद्यार्थिनी कुठेच प्रवेश घेऊ शकली नाही. या शिवाय दुसऱ्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांची माहिती समितीला न कळविणे, प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या ८५ अर्जापैकी २९ विद्यार्थ्यांचे अर्ज शुल्लक कारणांवरून (वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे वगैरे) नाकारणे,  गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना डावलणे आदी ठपका चौकशीत ठेवण्यात आला आहे.
*  अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज, सोलापूर (७) – महाविद्यालयाने गुणवत्ता आणि आरक्षणाचे नियम डावलून प्रवेश केले आहेत. विद्यार्थ्यांनी स्पीड पोस्ट आणि ईमेलने पाठविलेले अर्ज न स्वीकारणे.
*  तेरणा मेडिकल कॉलेज, नवी मुंबई (१०) – रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध न करताच २९ सप्टेंबरला ज्या पाच विद्यार्थ्यांना प्रवेश केले गेले ते नियमाला धरून नाहीत. या शिवाय गुणवत्ता आणि आरक्षणाचे नियम डावलून प्रवेश.
*  सिंहगड दंत महाविद्यालय (३५) – प्रवेश देताना केल्या जाणाऱ्या कौन्सिलिंगचा अहवाल नाही. नियम आणि गुणवत्ता डावलून प्रवेश
*  तेरणा दंत कॉलेज, नवी मुंबई – (१८) – रिक्त जागा भरताना नियम डावलले.
*  वायएमटी दंत महाविद्यालय, नवी मुंबई (१७) – कौन्सिलिंगच्या उपस्थितीचे रेकॉर्ड नसणे आणि गुणवत्ता डावलून प्रवेश करणे.
*  एमजीएम दंत महाविद्यालय, नवी मुंबई (१८) – कौन्सिलिंगच्या उपस्थितीचे रेकॉर्ड नसणे आणि अर्ज मिळाल्याची पावती विद्यार्थ्यांना न देणे
*  योगिता दंत महाविद्यालय, खेड (४१) – या महाविद्यालयाने रिक्त जागांवर असो-सीईटीऐवजी एमएचटी-सीईटीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस असो-सीईटीचे विद्यार्थी उपस्थित न राहिल्याने एमएचटी-सीईटीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे लागले हा महाविद्यालयाचा खुलासा समितीने अमान्य करून प्रवेश गुणवत्ता डावलून झाल्याचा ठपका ठेवला आहे.
*  उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव (१९) – समितीने नेमून दिलेले प्रवेशाचे वेळापत्रक धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांना संधी नाकारणे व गुणवत्ता डावलून प्रवेश
*  डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज, नाशिक (९) – रिक्त जागांची प्रसिद्ध करणे, आरक्षणाचे नियम धुडकावणे.
*  एसीपीएम मेडिकल कॉलेज, धुळे (२) – प्रवेश गुणवत्तेनुसार नाही
*  डॉ. व्ही. व्ही. पाटील मेडिकल कॉलेज, अहमदनगर (९) – प्रवेशासाठी उशीरा आल्याचे कारण देत एका विद्यार्थ्यांला प्रवेश नाकारल्याबद्दल समितीने अपारदर्शीपणे प्रवेश केल्याचा ठपका ठेवला आहे.
*  केबीएच दंत महाविद्यालय, नाशिक (१६) – रिक्त जागांची माहिती नियमानुसार प्रसिद्ध केली नाही आणि समितीचे प्रवेशाचे वेळापत्रक पाळले नाही.
* एनकेपी साळवे मेडिकल कॉलेज, नागपूर (११) – रिक्त जागांची माहिती नियमानुसार प्रसिद्ध केली नाही.
* डॉ. पी. डी. मेमोरिअल मेडिकल कॉलेज, अमरावती (४) – जात पडताळणी पत्र सादर करण्याची संधी न देता एका विद्यार्थ्यांला प्रवेश नाकारणे.