राज्यात २४ नोव्हेंबर २००१नंतर मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांना ‘कायम विनाअनुदानित तत्त्वावर’ही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे त्यापूर्वीच्या सन २००१ मधील महाविद्यालयांना अनुदान देण्यात येईल तसेच याबाबत लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी उपोषणग्रस्त शिक्षकांना दिले. यामुळे राज्यातील तब्बल ७८ महाविद्यालयांना तसेच १६०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
शासनाने २४ नोव्हेंबर २००१ रोजी व त्यापुढे मान्यतेसाठी आलेल्या महाविद्यालयांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिली आहे. पण वर्ष २००१ मध्ये या कालावधी पूर्वी मान्यता मिळालेली ७८ महाविद्यालयेही अनुदानापासून वंचित राहीली होती. या महाविद्यालयांना अनुदान मिळावे या मागणीसाठी १७ फेब्रुवारीपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदानात उपोषणासाठी बसले होते. शनिवारी टोपे यांनी या शिक्षकांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार होऊन २४ नोव्हेंबर २००१पूर्वी मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांना अनुदान देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे नमूद केले. याचबरोबर या महाविद्यालयांच्या उर्वरित मागण्यांवरही लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कृति समितीचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी सांगितले.
समितीतर्फे १०० टक्के अनुदान देण्यात यावे या मागणीबरोबरच या महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सेवा संरक्षित करून त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने लाभ देण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश
ssc recruitment 2024 career in staff selection commission jobs under the staff selection commission
नोकरीची संधी : ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’मधील संधी
The report revealed that only 7 percent of colleges get 100 percent recruitment through Campus Placement
‘कॅम्पस प्लेसमेंट’मधूनही नोकर भरतीला ग्रहण; केवळ ७ टक्के महाविद्यालयांतूनच १०० टक्के भरती झाल्याचे अहवालातून उघड