राज्यात १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्यामुळे बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत शिक्षणाशास्त्र तर दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत इंग्रजी साहित्य या विषयाची परीक्षा होती. मात्र, निवडणुकीमुळे या दोन्ही विषयांची परीक्षा त्याच वेळेत २० ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच इतर वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचेही मंडळाने सांगितले. परंतु शिक्षकांना निवडणुकीची कामे लागणार असल्याने आणखी दोन दिवसांच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून  होत आहे.