रविवारी पार पडणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेले डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी प्रकृतीचे कारण देत येण्यास नकार दिल्यामुळे विद्यापीठातील उच्च पदस्थांनी आयत्यावेळी प्रमुख पाहुण्यांची शोधाशोध सुरू केली होती. ही शोधाशोध रात्री उशीरापर्यंत संपली नव्हती.मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील संकुलातील राजाबाई टॉवरमध्ये दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे यंदाचा दीक्षांत समारंभ कालिना येथील क्रीडा संकुलात पार पडणार आहे. या सोहळय़ात एक लाख ६८ हजार १२६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार आहे. यात १,४४,२५३ पदवीधर तर २३,८७३ पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये विद्यार्थिनींची संख्या ८५ हजार १५० इतकी आहे. तसेच यावेळी ४७ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. दिली जाण्यात आहेत. दीक्षांत समारंभासाठी रविवार का?रविवारी पार पडणार असल्यामुळे हा दिवस कार्याचा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला असून त्या ऐवजी सोमवारी सुटी देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे अनेक शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रविवारी पूर्ण वेळ दीक्षांत समारंभात जाणार असल्यामुळे त्यादिवशीही व्याख्याने घेता येणार नसल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. विद्यापीठाने दीक्षांत समारंभ रविवार ऐवजी कार्यालयील दिवशीच ठेवणे योग्य ठरले असते असेही काही शिक्षकांनी नमूद केले. दरम्यान, डॉ. हातेकर यांच्यावरील कारवाईच्या भीतीने या प्रकरणी खुलेपणे बोलण्यासाठी कुणीही प्राध्यापक धजावत नाहीत.