मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
योग शिक्षणाच्या प्रसारासाठी 'नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग' (एनसीईआरटी) शाळांसाठी योग प्रकार तयार केले असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून या शिक्षणाची अंमलबजावणी शाळांमधून होण्याची शक्यता आहे.
लोणावळ्याच्या कैवल्यधाम संस्थेचे सहकार्य हे प्रकार तयार करण्यासाठी लागले आहे. योगासनांच्या फायद्यांची माहिती तरूणांना व्हावी यासाठी कैवल्याधामतर्फे लोणावळा येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एनसीईआरटीचे समन्वयक प्रकाश राव यांनी ही माहिती दिली. योगासनांमुळे माणसातील आध्यात्मिक प्रकृतीला चेतना मिळते. यामुळे एखाद्या व्यक्तीचे सामाजिकरण लवकर होते. मुलांमधील अनेक सुप्त गुणांना चालना देण्यासाठीही योगासनांचा उपयोग होतो. शारीरिक फायद्यांबरोबरच मुले जागरुक होतात. लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांना योगासनांचा उपयोग होतो, असे या परिषदेत बोलताना राव यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. हेमंत गोखले, निवृत्त न्या. बी. एन. कृष्ण, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख, कुलगुरू राजन वेळुकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारतासह अमेरिका, फ्रान्स, इटली, ब्राझील, चीन, कॅनडा, ग्रीस, कोरिया, पोर्तुगल आदी देशातील प्रतिनिधींनी परिषदेला हजेरी लावली.



















बाल वयात योगाभ्यास सुरु केला तर देशाला चांगले निरोगी प्रामाणिक निस्पृह कर्तबगार नागरीक मिळतील.गेली ३० वर्षे योगाभ्यास करीत आहे. अभ्यासाचा वेग मात्र निवृत्ति नंतर वाढला, योगाभ्यास करण्यासाठी सर्व प्रथम कैवल्य प्राप्ती करिता तीव्र संवेगाची अत्यंत गरज लागते.विवेक वैराग्य हळू हळु अंगी बाणू लागतो.. योगाभ्यास दीर्घ काल निरंतर आदराने होऊ लागतो दृढभुमि प्राप्त होते व अनुभवास येते की योगांग अनुष्ठानाने शरिरातील ,चित्तातील अशुद्धि क्षय होतो,इंद्रियावर(रसनेन्द्रियावर विशेष ) थोडाफार ताबा/जय मिळवता येतो,एकाग्रता वाढते बुद्धि प्रगल्भ होते व विवेकख्यातिची कल्पना येते ती म्हणजे .दृष्टा मी व दृश्य असलेले चित्त व त्याच्या असंख्य वृत्ति या पासून वेगळा आहे संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अध्याय सहा मध्ये योगाभ्यासाठी लागणार्या आसनाचे वर्णन अगदी साध्या व सोप्या भाषेत केलेले आहे त्याचा फायदा झाला. आत्यंतिक,इन्द्रायातीत, बुद्धि ग्राह्य सुख काय असते ते समजले.कोणताही औषाधा शिवाय शीतल शान्तिचा सुखद अनुभव घेत आहे