मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि १८९२ साली मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असलेले न्या. काशीनाथ तेलंग यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. देशाचे पहिले मराठी कुलगुरू म्हणून त्यांची ओळख आहे. या व्याख्यानमालेसाठी दरवर्षी तीन लाख रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.