महाविद्यालयाची भूमिका :१२ वीची परीक्षा संपल्यानंतर जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येतात, तेव्हा तिथल्या मुक्त वातावरणात विद्यार्थी बऱ्याचदा भरकटण्याची शक्यता असते.महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर लेक्चर्स न बसणे हा अलिखित नियमझालेला असतो. जेव्हा महाविद्यालय संपत येते, तेव्हा लक्षात येते की आपणचांगल्या भविष्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करावयास हवी, त्यात एखाद्यायशस्वी उमेदवाराची मुलाखत वाचून आपण जास्तच प्रभावित होतो.पुस्तकांच्या दुकानात जातो, पुस्तक घेऊन येतो आणि अभ्यासाला सुरुवातकरतो. मात्र अभ्यासाची सवय कधीच सुटलेली असते, अध्र्या तासात पाठदुखावयास लागते, सर्व शक्ती एकवटून अभ्यासाला सुरुवात करतो, स्पर्धापरीक्षा समजून घ्यावयास पुढचे दोन वर्षे निघून जातात. अगदी गणिताच्याभाषेत बोलावयाचे झाल्यास पुढची पाच वर्षे निघून जातात. वाढलेले वय,आपण काही करावे यासाठी पालकांकडून वाढणारा दबाव, यामुळे विद्यार्थीआणखी भरकटत जातो. अशी अवस्था महाराष्ट्रातील खूपशा विद्यार्थ्यांचीआहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर इ. शहरांचा विचार बाजूला ठेवला तरउर्वरित महाराष्ट्रात विद्यार्थ्यांची वाट अधिकच बिकट आहे, नव्हे ती आपणचकेली आहे.स्पर्धा परीक्षेत विशेषत: संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षेत पासहोण्यासाठी म्हणजे आय.ए.एस., आय.पी.एस. होण्याची क्षमता महाराष्ट्रीयनतरुणांमध्ये ठासून भरलेली आहे. एम.पी.एस.सी. किंवा यू.पी.एस.सी. यापरीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच झाल्यानंतर तर परिस्थिती जास्तच अनुकूलझाली आहे. मात्र खेदाची गोष्ट ही आहे, की महाविद्यालयाच्या तीन किंवा चारवर्षांच्या दरम्यान जी तयारी व्हावयास हवी ती होत नाही. यू.पी.एस.सी. किंवाएम.पी.एस.सी. परीक्षेच्या तयारीसाठी ही तीन वर्षे अत्यंत महत्त्वाची असतातआणि त्यांचा योग्य प्रकारे वापर व्हावा. या परीक्षेसाठी लागणारा अभ्यास म्हणजेइतिहास, भूगोल, भारतीय संविधान, सायन्स, अर्थशास्त्र यांचा अभ्यास अत्यंतसविस्तरपणे महाविद्यालयामध्ये होऊ शकतो.काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थी माझ्याकडे यूपीएससी परीक्षेच्या मुख्यपरीक्षेच्या भूगोल या वैकल्पिक विषयाचे मार्गदर्शन घेण्यासाठी आला. त्यानेआधी दोन वेळा मुख्य परीक्षा लिहिली होती. तो ज्या महाविद्यालयामधून आलाहोता, त्या महाविद्यालयामधील भूगोल विभागाच्या जवळजवळ सर्वप्राध्यापकांना मी चांगले ओळखत होतो. त्यातील काही प्राध्यापक खूपच तज्ज्ञहोते. सहज मी त्या विद्यार्थ्यांला प्रश्न विचारला, की त्याने महाविद्यालयामध्ये असताना किंवा महाविद्यालय संपल्यानंतर त्या प्राध्यापकांची का मदत घेतली नाही, तेव्हा उत्तर मिळाले की त्यांना यूपीएससीबद्दल विशेष माहिती नाही. मान्य आहे त्यांना यूपीएससी परीक्षेबद्दल विशेष माहिती नसेल, परंतु यूपीएससी परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी त्या विद्यार्थ्यांने जो वैकल्पिक विषय घेतला होता, त्याचे ज्ञान मात्र त्यांच्याकडे खूपच चांगले होते. फक्त मुख्य परीक्षेचा त्या विषयाचा अभ्यासक्रम त्यांच्याकडे घेऊन जाऊन त्यांच्याकडून खूप चांगली मदत होऊ शकली असती आणि जर त्याने हाच अभ्यास महाविद्यालयामध्येच पूर्ण केला असता तर यश मिळण्याची शक्यता जास्त निर्माण झाली असती.यूपीएससीच्या तयारीसाठी महाविद्यालयाची कशी मदत होऊ शकते ?* महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यापासून म्हणजे पदवीच्या प्रथमवर्षांपासूनच अभ्यासाला सुरुवात करावी, म्हणजे येणाऱ्या तीन किंवा चारवर्षांत यूपीएससीची तयारी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते.* यूपीएससी व एमपीएससी परीक्षेच्या पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमव्यवस्थित समजला नाही तर संबंधित विषयांच्या प्राध्यापकांकडून समजूनघ्यावा. अभ्यासक्रमासंबंधी पुस्तकं आपल्या ग्रंथालयात उपलब्ध असतील तरत्यांचे वाचन करावे, याशिवाय इतर पुस्तकांचेही वाचन करावे.* या काळात इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करावा. संपूर्णयूपीएससी परीक्षा जरी मराठीत देता येत असली तरी इंग्रजीचे महत्त्व कमी होतनाही. निवड झाल्यानंतर प्रशासकीय कामात बऱ्याच वेळा इंग्रजीचा संबंधयेणारच असतो, याशिवाय यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत काही उतारे फक्तइंग्रजीमध्ये असतात व मुख्य परीक्षेत ३०० गुणांचा एक इंग्रजीचा पेपरलिहावाच लागतो. जरी त्या गुणांचा वापर अंतिम यादीसाठी केला जात नसलातरी हा पेपर पास होणे आवश्यक आहे. पास झालो नाही तर इतर पेपर तपासलेजात नाहीत, म्हणजे आपण परीक्षेत अपयशी ठरतो.* संघ लोकसेवा आयोगाच्या तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी गणित हाघटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यूपीएससीच्या प्रारंभिक परीक्षेसाठी सी सॅटचा जोदुसरा पेपर आहे त्यात गणिताचा हा घटक येतो. जरी हा पेपर फक्त गणितावरचआधारित नसला, तरी ज्या विद्यार्थ्यांची गणितावर पकड घट्ट असते, त्यांना हापेपर सोडविताना अडचण होत नाही व त्यांना या पेपरमध्ये जास्तीतजास्त गुणमिळवून, मुख्य परीक्षेसाठीचा मार्ग सोपा होतो.* कोठून सुरुवात करावी या प्रश्नाचे उत्तर म्हणजे एन.सी. ई.आर.टी.चीइ. ५ वी ते १० वी पर्यंतची सर्व विषयांची पुस्तके सर्वप्रथम वाचून टाकावीत.पदवी झाल्यानंतर या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा पदवीचे शिक्षण घेतअसतानाच ही पुस्तके वाचली असतील, त्यातील मूलभूत संकल्पना समजूनघेतल्या असतील तर पुढचा अभ्यास करणे जास्त सोपे होते.महाविद्यालयामध्ये असतानाच इतिहास, भूगोल, भारतीय संविधान,अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना यांचा अभ्यास करून ठेवावा. जमल्यासत्यांच्या नोट्स तयार करून ठेवाव्यात.