जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र माघार घेण्याच्या मुदतीनंतर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६७ गटांसाठी ३२२ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १३४ गणांसाठी ५८३ उमेदवार निवडणूक िरगणात उभे असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. ना

Central Bureau of Investigation Bharti various vacant posts of Consultants job location is Mumbai
CBI Bharti 2024 : सल्लागार पदासाठी सीबीआयमध्ये पदभरती; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख
narendra modi
प्रचार संपल्यानंतर मोदींचे रालोआ उमेदवारांना पत्र
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया

मनिर्देशनपत्रे माघार घेतल्यानंतर आज जिल्हा परिषदेसाठी ३२२ उमेदवार निवडणूक िरगणात असून, त्यांची तालुकानिहाय माहिती अशी. शाहूवाडी तालुका-१५, पन्हाळा तालुका २९, हातकणंगले तालुका ५५, शिरोळ-३३, कागल २३, करवीर ६६, गगनबावडा ९, राधानगरी २०,  भुदरगड-२१, आजरा ८, गडिहग्लज २० आणि चंदगड तालुक्यात २३ उमेदवार आहेत. तर पंचायत समितीसाठी ५८३ उमेदवार निवडणूक िरगणात असून, त्यांची तालुकानिहाय माहिती अशी. शाहूवाडी तालुका-२४, पन्हाळा तालुका ५०, हातकणंगले तालुका १०६, शिरोळ-५७, कागल ३९, करवीर ९९, गगनबावडा १५, राधानगरी ४६, भुदरगड-४२, आजरा २४, गडिहग्लज ४६ आणि चंदगड तालुक्यात ३५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.