सेनादलाच्या हरिओम सिंगने ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर रायफल प्रोन विभागात सुवर्णवेध घेतला. शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत हरिओमने अंतिम लढतीत २०५ गुण नोंदविले. उत्तर प्रदेशच्या आदित्य सिंग याने २०४.८ गुण नोंदवत रौप्यपदक मिळविले. अभिनव बिंद्राने प्रोन विभागात आपले कौशल्य अजमावताना १८३.८ गुण नोंदवले आणि कांस्यपदक पटकावले. सांघिक विभागात सेनादलाने १८५५.३ गुण नोंदवत सोनेरी कामगिरी केली. या संघात चैन सिंग, सुरेंद्रसिंग राठोड व सुशील कुमार यांचा समावेश होता. हवाई दल व उत्तर प्रदेश यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकाविले. कुमार गटात उत्तर प्रदेशने सुवर्णपदक जिंकले तर महाराष्ट्राला रौप्यपदक मिळाले. सेनादलाने कांस्यपदक पटकाविले.