मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाने ३-० असा धुव्वा उडवल्याने स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सलग चार वेळा विजेतेपद मिळविले आहे. पाचव्या विजेतेपदासाठी ते उत्सुक असून घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा त्यांना मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या जेमी डेवरनं सहाव्याच मिनिटाला पहिला गोल केला. तर पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल करत डेवरनं पहिल्या हाफपर्यंत ऑस्ट्रेलियाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये तिसरा गोल नोंदवत ऑस्ट्रेलियाने भारताचं आव्हान संपुष्टात आणलं. भारताचा कर्णधार सरदारा सिंग व मध्यरक्षक मनप्रित सिंग हे दोन्ही अनुभवी खेळाडू या लढतीत दुखापतीसह मैदानात उतरले होते. भारताच्या दृष्टीने ही लढत महत्त्वाची असल्यामुळे या दोन्ही खेळाडूंचा सहभाग आवश्यक होता. मात्र, कुठल्याही खेळाडूला विशेष चमक दाखवता आली नाही. चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळण्याची भारताची ही सहावी वेळ आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















