अंतिम सामन्यात भारतीय महिला गोलंदाजांनी टिच्चून मारा करत इंग्लंडच्या संघाला अवघ्या २२८ धावांवर रोखलं. भारतीय गोलंदाजीची खरी हिरो ठरली ती झुलन गोस्वामी. आपल्या १० षटकांमध्ये झुलनने केवळ २३ धावा देत इंग्लंडच्या फलंदाजीला वेसण घातली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या षटकांमधली ३ षटकं ही निर्धाव टाकली आहेत. अंतिम सामन्यात ३ बळी घेत झुलनने इंग्लंडच्या संघाचा कणाच मोडला.

तिच्या या ड्रीम स्पेलवर भारतीय संघाचे आजी-माजी खेळाडू चांगलेच खूश झाले आहेत. ट्विटरवरुन भारताच्या खेळाडूंनी झुलनचं कौतुक केलंय. पाहुयात यापैकी काही निवडक प्रतिक्रिया.