पहिल्या डावात ९७ धावांची आघाडी मिळविलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला प्रत्युत्तर देताना दुसऱया डावात भारताचा फॉर्मात असलेला सलामीवीर मुरली विजय स्वस्तात बाद झाला. विजय केवळ २७ धावा ठोकून माघारी परतला. तिसऱया दिवसाअखेर भारताची धावसंख्या १ बाद ७१ अशी असून ऑस्ट्रेलियाकडे अजूनही २६ धावांची आघाडी आहे. शिखर धवन(२६) आणि चेतेश्वर पुजारा(१५) नाबाद आहेत.ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि मिचेल जॉन्सन यांनी केलेल्या सुरेख भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारतावर ९७ धावांची आघाडी मिळवली. स्टिव्ह स्मिथ याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करीत शतक झळकावले. त्याने १३३ धावा केल्या. त्याला दुसऱया बाजून मिचेल जॉन्सन यानेही चांगली साथ देत ८८ धावा केल्या. दुसऱया कसोटीच्या पहिल्या डावात भारताने सर्वबाद ४०८ धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सर्वबाद ५०५ धावा झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला आकार देण्यात स्टिव्ह स्मिथ आणि जॉन्सन यांनीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांनी भारताच्या गोलंदाजीला मैदानावर चोख प्रत्युत्तर दिले.गोलंदाजीमध्ये इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. वरूण आरोन आणि आर. अश्विन यांना प्रत्येकी दोन गडी बाद करण्यात यश मिळाले.