भारत-पाकिस्तान यांच्यातील मालिका पुढे ढकलली जाणार अशी चर्चा जोरात होती. मात्र आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका लवकरच सुरू होण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरियार खान यांनी नुकतीच कोलकाता येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि नवी दिल्लीत सचिव अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी डिसेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे भारत-पाकिस्तान मालिका खेळवण्याचा प्रस्ताव त्यांनी भारतापुढे ठेवला. ‘‘नुकतीच दोन्ही क्रिकेट मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. परंतु भारत-पाकिस्तान मालिका पुन्हा तातडीने सुरू होण्याची शक्यता नाही,’’ असे शुक्ला यांनी सांगितले.