श्रीलंकेविरुद्धच्या आगामी ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्यादृष्टीने या मालिकेसाठी भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. येत्या ९ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची ही ट्वेन्टी-२० मालिका सुरू होत आहे.

निवड झालेला भारतीय संघ पुढीलप्रमाणे:
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवऩ, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे,  युवराज सिंग, सुरेश रैना, मनिष पांडे, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, पवन नेगी.