झिम्बाब्वे दौऱयासाठी रवाना होणाऱया भारतीय संघाला सुरूवातीलाच धक्का बसला आहे. झिम्बाब्वे दौऱयासाठी निवड करण्यात आलेला फिरकीपटू कर्ण शर्मा याला दुखापतीमुळे दौऱयातून माघार घ्यावी लागली आहे. कर्ण शर्माच्या डाव्या हाताचे मधले बोट फ्रॅक्चर झाले असल्याने त्याला झिम्बाब्वे दौऱयाला जाता येणार नसल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे. कर्ण शर्माच्या जागी दुसऱया कोणत्याही खेळाडूचा समावेश देखील करण्यात आलेला नाही. त्यामुळे भारतीय संघ १४ खेळाडूंच्या चमूसह झिम्बाब्वे दौऱयावर मंगळवारी रवाना होणार आहे. आयपीएल मधील चांगल्या कामगिरीमुळे कर्ण शर्माची झिम्बाब्वे दौऱयावर जाणाऱया अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघात निवड करण्यात आली होती. झिम्बाब्वे दौऱयात तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश आहे.