इशांत शर्माच्या सहा बळींच्या जोरावर दिल्लीने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत विदर्भचा डाव २९८ धावांत गुंडाळला. दुसऱ्या दिवसअखेर गौतम गंभीर आणि नितीश राणाच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने २ बाद १३२ अशी मजल मारली आहे. प्रत्युत्तरादाखल दिल्लीच्या गंभीर आणि राणा जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक
विदर्भ पहिला डाव सर्वबाद २९८ (फैझ फझल ५६, इशांत शर्मा ६/३६) विरुद्ध दिल्ली पहिला डाव २ बाद १३२ (गौतम गंभीर खेळत आहे ६२, राणा खेळत आहे ५७)