चौथ्या भाई नेरुरकर स्मृती चषक राज्यस्तरीय खो-खो स्पध्रेत पुरुष गटात मुंबई उपनगर, मुंबई, तर महिला गटात मुंबई उपनगर या संघांनी उपांत्य फेरी गाठली.
पुरुष गटात मुंबईने ठाण्याचा १६-१३ असा पराभव केला.  रुपेश खेतले, श्रेयस राऊळ व प्रसाद राडिये यांनी उत्कृष्ट खेळ केला.  मुंबई उपनगरच्या पुरुष संघाने उस्मानाबादवर १८-११ अशी एक डाव सात गुणांनी मात करून उपांत्य फेरी गाठली. उपनगरच्या दीपेश मोरे, दुर्वेश साळुंके, गणेश दळवी व किरण कांबळे यांनी सुरेख खेळ केला. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबई उपनगरने सातारा संघाला १३-९ असा पराभवाचा धक्का दिला. विजयी संघाकडून श्रुती सकपाळ, कविता गोलांबडे, मयूरी पेडणेकर व कीर्ती चव्हाण यांनी उत्तम खेळ केला.