महाराष्ट्राच्या श्रीकांत मुंढेने झंझावाती शतक झळकावले, मात्र त्याच्या संघाला दिल्लीविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात विजयाची संधी साधता आली नाही. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर महाराष्ट्राने तीन गुणांची कमाई केली.
या सामन्यात महाराष्ट्राने ५ बाद १८७ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. मुंढेने १०५ धावा केल्यामुळे संघाला ३६८ धावा करता आल्या. विजयासाठी ३९२ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना दिल्लीने २३ षटकांत ३ बाद ७८ धावा केल्यानंतर सामना अनिर्णीत म्हणून जाहीर करण्यात आला.