फिरकीच्या जोरावर झारखंडची भंबेरी उडवत मुंबईने दिमाखदारपणे उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईने झारखंडपुढे विजयासाठी ४९० धावांचे आव्हान ठेवले होते. इक्बाल अब्दुल्ला व जय बिश्ता या दोन्ही फिरकीपटूंनी झारखंडच्या फलंदाजांना नाचवत त्यांचा अवघ्या ९५ धावांमध्येच खुर्दा उडवला आणि मुंबईने ३९५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
शिव गौतम (२७) आणि विराट सिंग (२६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी रचली. पण त्यानंतर मात्र झारखंडचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

संक्षिप्त धावफलक
मुंबई : ४१६ आणि २४५. विजयी वि. झारखंड : १७२ आणि ४२.२ षटकांत सर्व बाद ९५ (शिव गौतम २७, विराट सिंग २६; जय बिश्ता ५/१६, इक्बाल अब्दुल्ला ५/३५).
सामनावीर : अखिल हेरवाडकर