कर्नाटकसारख्या बलाढय़ संघाविरुद्ध दमदार कामगिरी करत मुंबईने उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले असून, त्यांच्यापुढे आता आव्हान असेल ते दिल्लीच्या संघाचे. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना कटक येथे होणार आहे. गतविजेता कर्नाटक आणि आसाम यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना इंदोरला होणार आहे. विदर्भ आणि तामिळनाडू यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना जयपूर येथे, तर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांच्यातील सामना लाहिली येथे खेळवण्यात येईल. उपांत्यपूर्व फेरीचे सामने १६ फेब्रुवारीपासून सुरू होतील. उपांत्य फेरीचे सामने २५ फेब्रुवारीपासून बंगळुरू आणि कोलकाता येथे खेळवण्यात येतील. अंतिम फेरीचा सामना ८ मार्चपासून वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.