वेगवान गोलंदाज बलविंदर संधूच्या पाच बळींमुळे आंध्र प्रदेशला फार मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. मग सिद्धेश लाडच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद १५८ धावा केल्या.मुंबईची प्रारंभी ४ बाद ६१ अशी अवस्था झाली होती, परंतु २३ वर्षीय सिद्धेशने निखिल पाटील (२७) सोबत पाचव्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. सिद्धेशने १०७ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६८ धावा केल्या. आंध्रच्या पहिल्या डावातील २४४ धावसंख्येपासून मुंबईचा संघ अद्याप ८६ धावांनी पिछाडीवर असून, त्यांचे पाच फलंदाज बाकी आहेत.