तन्मय श्रीवास्तव आणि प्रशांत गुप्ता यांच्या दिमाखदार फलंदाजीच्या बळावर रणजी स्पध्रेच्या ‘अ’ गटातील लढतीत उत्तर प्रदेशने मुंबईविरुद्ध पहिल्या दिवशी १ बाद ११५ अशी दमदार सुरुवात केली आहे. खराब हवामानामुळे ग्रीन पार्क स्टेडियमवरील या सामन्यांत फक्त ५० षटकांचा खेळ होऊ शकला.
उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने मुकुल डागरचा (१५) अडसर दूर केला. परंतु श्रीवास्तव आणि गुप्ता यांनी ८७ धावांची नाबाद भागीदारी करून संघाचा डाव सावरला. खेळ थांबला तेव्हा, श्रीवास्तव ४९ व गुप्ता ४१ धावांवर खेळत होते.