ट्वेंन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून एका धावेने स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर संघातील एकही सदस्याने रात्रीचे जेवण केले नाही, असे बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मोर्तझाने सांगितले.
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात भारताने एका धावेने विजय मिळवला होता. शेवटच्या तीन चेंडूत बांगलादेशला दोन धावा हव्या होत्या. मात्र त्यांनी त्या तीन चेंडूत तीन गडी गमावले. हा पराभव बांगलादेशच्या चांगलाच जिव्हारी लागला. या पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मोर्तझा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रात्रीचे जेवणही घेतले नाही, असे मोर्तझा म्हणाला. मुर्तझा हा सध्या काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आला आहे. त्यानिमित्त त्याने स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Shikhar Dhawan's Shoulder Injury Updates in Marathi
Punjab Kings : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबला दुसरा धक्का, शिखर धवन पुढील काही सामन्यांना मुकणार
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024: केकेआरविरुद्ध ८३ धावांची खेळी करूनही विराट कोहली का होतोय ट्रोल? RCBचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी