आधुनिक मराठी समीक्षा ही कथा, कविता, कादंबरी, ललित गद्य इ. च्या पलीकडे गेलेली नाही. वास्तविक संत-साहित्य हे मराठीचा मानदंड मानले जाते. संत-साहित्य हे मराठी साहित्याची गंगोत्री आहे. परंतु आधुनिक मराठी समीक्षेने संत-साहित्याला समीक्षा-परिघाबाहेरच ठेवले असून आजची समीक्षा संत-साहित्याला अस्पृश्य मानते की काय, अशी स्थिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी वाङ्मय समीक्षेतील संत-साहित्याचे दालन हे दुर्दैवाने अलीकडे अनुल्लेख व दुर्लक्षिततेच्या कडीकुलपात बंद आहे. आजची मराठी समीक्षा ही फक्त ललित वाङ्मयापुरतीच मर्यादित झाली आहे/ ठेवली गेली आहे. आधुनिक मराठी समीक्षा ही कथा, कविता, कादंबरी, ललित गद्य इ. च्या पलीकडे गेलेली नाही. वास्तविक संत-साहित्य हे मराठीचा मानदंड मानले जाते. नव्हे, ते आहेच. संत- साहित्य हे मराठी साहित्याची गंगोत्री आहे. ते मुख्यत्वेकरून ओवी, अभंग अशा काव्यरूपातच अवतरले आहे. संतांनी आपला गद्यविचारही जनमानसासमोर पद्यरूपानेच मांडला. मराठी साहित्याचे संस्थापकत्व, आदिबंध हे मराठी संत- साहित्यालाच द्यावे लागेल. प्रजासत्ताकोत्तर काळात आधुनिक मराठी समीक्षेने संत-साहित्याला समीक्षा-परिघाबाहेरच ठेवले असून आजची समीक्षा संत-साहित्याला अस्पृश्य मानते की काय, अशी स्थिती आहे. स्वत:ला समीक्षेचे भाष्यकार म्हणवणारे महानुभावदेखील संत-वाङ्मयाला आजच्या समीक्षावर्तुळात घेत नाहीत. हे मराठीचे वाङ्मयीन दौर्बल्य आहे. परिणामी साहित्याच्या सर्व प्रकारांना, क्षेत्रांना स्पर्श करण्याऐवजी आजची मराठी समीक्षा ललित वाङ्मयाच्या पिंडीलाच वेटोळे घालून बसली आहे. संतकाव्य हे काव्य नाही का? जर असेल तर त्यावर अलीकडे झालेल्या लिखाणाची समीक्षा का केली जात नाही? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. नाही म्हणायला माझ्या माहिती व अभ्यासाप्रमाणे, असा प्रयत्न पूर्वी डॉ. मा. गो. देशमुख यांनी ‘मराठीचे साहित्यशास्त्र- ज्ञानेश्वर ते रामदास’ या समीक्षा- ग्रंथातून (१९४०) केला आहे. आपल्या पसंतीच्या संतांवर त्यांच्या वाङ्मयाचा समग्र, संक्षिप्त वा विशिष्ट अंगाने धांडोळा घेऊन ‘साहित्य वाचस्पती’ पदवी मिळविणारे आहेत. परंतु हे प्रमाणही काहीसे मर्यादित स्वरूपाचे आहे. संतांच्या कवितेवर लिहिलेले सर्व काही आजच्या समीक्षेत अंतर्भूत होणे अनिवार्य व आवश्यक आहे. त्यामुळे संत- विचारांचा, त्यांच्या प्रबोधनाचा प्रचार, प्रसार व त्यानुसार वागणूक झाली असती. आज ज्याची आत्यंतिक निकड आहे, तेच आज अस्पर्शित झाले आहे. हे दृश्य खंतावणारे आहे. नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतकवितेच्या पंचप्राणांसह इतरही अनेक संतांनी व संत- कवयित्रींनी आपले जीवनसंचित या कामी लावले आहे. त्यांच्या साहित्याला आज उतारवयातील वा निवृत्तीकाळातील ‘वाचन’ म्हणून समीक्षेतून बाद करण्याची प्रवृत्ती नक्कीच गर्हणीय आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aravind brahme article on marathi literature
First published on: 27-08-2017 at 03:12 IST