पहिल्या सामन्यात मिळवलेला दमदार विजय आणि दुसऱ्या सामन्यात पदरी पडलेला पराभव यामुळे बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय ‘अ’ संघाची १-१ अशी बोरबरी झाली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या मालिकेतील अखेरचा सामना जिंकण्यासाठी भारताचा संघ सज्ज झाला असून या विजयासह त्यांना मालिका जिंकता येणार आहे. दुसरीकडे बांगलादेशलाही समान संधी असेल.