सभोवतालच्या निर्गुण, निराकार, अव्यक्त पोकळीला अर्थपूर्ण करते ती वास्तुकला! प्रत्येक वास्तू ही एक सांस्कृतिक विधान असते. कुठल्याही कलेचा उपयोग पोट भरण्यासाठी की आत्मसमाधानासाठी, ही निवड lok20कलावंत आपल्या विचारानुसार करीत असतो. मूलभूत विचार करून कला निर्माण करणारे कलावंत विरळाच असतात. परंतु अशा दुर्मीळ कलावंतांमुळे प्रवाह बदलू शकतात. तर बाकीच्या इतरांमुळे बाजारपेठ वाढत जाते. काळाच्या ओघात इतर कलांप्रमाणे वास्तुकलादेखील बदलत गेली. बाजारपेठ व मागणी अनुरूप बांधकामांची संख्या वाढत गेली. आज सर्वत्र समाजातील स्थान, श्रीमंती अभिव्यक्त करणारी बांधकामे सर्रास आढळतात. ‘वास्तुकला म्हणजे सुसंस्कृततेचं प्रकटीकरण’ याचा वास्तुविशारद व ग्राहक दोघांनाही विसर पडत चालला आहे. अशा वेळी अहमदाबादेतून अमेरिकेत स्थायिक झाल्यावर तिथे आणि अनेक देशांत वास्तुकलेचा ठसा उमटविणाऱ्या सुधीर जांभेकर यांनी ‘हे विश्वाचे अंगण’ या आत्मपर पुस्तकातून आपले वास्तुविचार मांडले आहेत.
जांभेकर १९६४ साली मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून वास्तुविशारद झाले. काही काळ मुंबईत नोकरी, नंतर स्वत:चा व्यवसाय करून १९६९ साली ते न्यूयॉर्कमध्ये प्रारूपकार (ड्राफ्टस्मन) या हुद्दय़ावर नोकरी करू लागले. विशारद असून प्रारूप करण्याचे काम हा त्यांना अपमान वाटला खरा, परंतु काही दिवसांतच त्यांची दृष्टी बदलून गेली. पडेल ते काम शिस्तीत करण्याचा शिरस्ता त्यांच्या अंगवळणी पडला. सुरुवातीला त्यांना अमेरिकन इंग्रजीचे उच्चार समजत नसत. पण लक्षपूर्वक ऐकत श्रवणक्षमतेचा पूर्ण वापर करून जांभेकर त्या वातावरणाशी सरावून गेले. ज्येष्ठ वास्तुविशारदांसोबतच्या अनुभवातून शिकत गेले. त्या वेळी अमेरिकेत प्रचंड वैचारिक घुसळण होत होती. व्हिएतमानमधील अमेरिकी हल्ल्याच्या विरोधात देशभर निदर्शने चालली होती. वर्णद्वेषाविरोधी लढय़ाचे अिहसक नेते मार्टनि ल्युथर किंग यांच्या हत्येने वातावरणात क्षोभ होता. तर याच काळात मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्यामुळे विज्ञान जगत भारावून गेले होते. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विश्व बदलविण्यासाठी जगभरातील तरुण अनेक प्रयत्न करीत होते. साहित्य, चित्रपट, संगीत, वास्तुकला या क्षेत्रात नवीन कल्पनांना बहर येत होता. लेखकांनी हे सारे बाह्य बदल मन:पूर्वक समजून त्यानुरूप स्वत:मध्ये बदल घडवून आणले. ‘सत्याग्रह म्हणजे काय?’ या प्रश्नावर ते निरुत्तर झाले. भारतीय इतिहासाकडे झालेले दुर्लक्ष लक्षात आल्यावरच त्यांची मान खाली गेली lr15आणि खाडकन जाग आली. मग त्यांनी गांधीजींचं ‘सत्याचे प्रयोग’, पं.नेहरूंचं ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, रियासतकार सरदेसाईंचे आठ खंड अशी भारतातील उत्तमोत्तम पुस्तके वाचण्याचा सपाटा लावला. यातून आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच वेळी जांभेकरांनी कोलंबिया विद्यापीठातून स्थापत्य आणि नगररचना या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. चौदा र्वष वास्तुरचनेचा अनुभव घेतल्यानंतर मार्क स्ट्राऊस या मित्रासोबत ‘जांभेकर-स्ट्राऊस आíकटेक्ट्स ’ स्थापून व्यवसायात उडी घेतली. काही दिवसांनी न्यू जर्सी शहराच्या लाइटरेल स्टेशनची रचना करण्याचा प्रस्ताव आला. तिथे जमिनीच्या खाली १६० फुटांवर रेल्वे धावते. डोंगरातील उभा बोगदा आणि त्यावरील स्टेशन हे नदीकाठच्या दोन्ही लोकांना सोयीचे होते. ही रचना करताना जांभेकरांनी निसर्गत: लाभलेल्या प्रागतहासिक काळातील प्रचंड खडकाचा छतासारखा वापर केला. लाल रंगातील विटा आणि काच यांचा उपयोग करून नसíगकता जपली. नंतर जांभेकरांकडे अमेरिकेतून उत्तम कामाचा ओघ चालू झाला. तिथे सामान्य माणसांच्या सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. बालक, वृद्ध आणि अपंगांचा सहज वावर व्हावा याचा विचार केला जातो. कुठलाही मोठा प्रकल्प करताना अभियंते, तंत्रज्ञ आणि वास्तुविशारद यांना एकत्र येऊन काम करावे लागते. असे प्रकल्प कौशल्याने पूर्ण केल्यामुळे जांभेकरांचा लौकिक वाढू लागला. दुबई, रियाध, बगदाद, दोहा अशा मध्यपूर्वेतील महानगरांमधील प्रस्ताव त्यांच्याकडे येऊ लागले.
दुबईमधील मरीना टॉवर या ४० हेक्टरवरील मध्यमवर्गीयांच्या निवासी रचनेसाठी पाण्यात झेपावणाऱ्या हाताच्या बोटांसारख्या इमारतींची पर्यावरण स्नेही रचना जांभेकरांनी केली. पाण्याला अडथळा न करता कालव्यासारखा वापर केला. नसíगक वायूवीजनाची सोय केली. अरबस्तानातील वाळवंटी रियाद (मूळ अर्थ उद्यान)मध्ये मशीद करताना दिवसाचा असह्य उष्मा सहन करण्यासाठी जाळीदार िभत केली. सभोवताली झाडी देऊन पाणी खेळवले. यामुळे संपूर्ण वास्तू पाण्यावर तरंगत असल्याचा भास होतो. या वास्तूला अनेक पुरस्कार लाभले.
बांधकाम करताना कमीत कमी सामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, निसर्गाला त्रास देऊ नये, बांधकामाचा वापर सुरू झाल्यावर वीज, पाणी या नियमित खर्चात कपात व्हावी, अशा पर्यावरण स्नेहाच्या lr16अनेक कल्पना युरोप व अमेरिकेत स्वीकारल्या गेल्या. पर्यावरण रक्षणासंबंधीच्या नियमांचे पालन कसे होते यावर इमारतींची गुणवत्ता ठरते. जांभेकर व त्यांच्या संस्थेने ‘हरित वास्तू’स प्राधान्य दिले. त्यांच्या अनेक इमारतींना उत्तम असल्याचे प्रमाणपत्र लाभले. पायाभूत सुविधा, शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक व निवासी रचना करताना अनेक पातळ्यांवर विचार करून वास्तुकला साकारायची असते. समाज आणि कला यासंबंधीचे जांभेकरांचे चिंतन अनेक ठिकाणी वाचावयास मिळते.
भारतीय व पाश्चात्त्य संगीत, चित्र, काव्य यामध्ये कलासक्त जांभेकर रममाण होतात. जयदेव यांच्या गीतगोिवदवरील कांगडा शैलीतील चित्रे, रामुकमार, सूझा, जामिनी रॉय यांची चित्रे, तांबे व पाडगावकर यांच्या कविता, कुमार गंधर्व व भीमसेन जोशी यांच्या गायनाविषयी त्यांनी भरभरून लिहिले आहे. सर्व कलांच्या निर्मितििवषयीचे त्यांचे कुतूहल या पुस्तकात वारंवार जाणवत राहते. स्थिर स्वरूपाच्या वास्तुकलेमध्ये संगीतातील प्रवाहीपणा आणण्याचा त्यांचा ध्यास अपूर्व आहे.
दुबईच्या खाडीकडे वरून पाहिल्यावर अरबी लिपीसारखा लफ्फेदार वळणांचा ओघवता नयनमनोहर पूल म्हणजे पाण्यावरील प्रवाही अक्षरेच वाटतात. रात्रीच्या प्रकाशात ही वलयांकित रचना पाण्यावर चंद्रकोरीचा (तर कधी पूर्णचंद्राच्या) भास निर्माण करते. पूल ही केवळ स्थापत्यरचना नसून सांस्कृतिक अभिव्यक्ती आहे, याची प्रचीती हा पूल देतो. पाच खाडय़ांना पार करणारा बारा पदरी पूल मेट्रो स्टेशनपर्यंत येतो. या पुलाच्या सान्निध्यात पक्ष्यांसाठी संरक्षित क्षेत्र ठेवले आहे. नवी व जुनी दुबई, सांस्कृतिक व भावनिकता यांना सांधणाऱ्या या पुलाची जगभर चर्चा झाली. प्रत्यक्ष काम कधीही चालू होऊ शकण्याच्या टप्प्यात आलं आहे. दोहा येथील विमानतळापासून सहा किलोमीटर लांबीचा पूल बांधताना जांभेकरांनी पाण्याखालून बोगदा आणि बाहेर दोन पूल दिले. समुद्रलाटांमध्ये शुभ्र िशपले तरंगत असल्याचा भास निर्माण करणारी ही रचना आहे.
जांभेकर ‘‘शहरीकरण, पर्यावरणरक्षण आणि सामाजिक बांधिलकी या तीन घटकांविषयीच्या चिंतनातून वास्तुरचनेची (डिझाइन) निर्मिती व्यक्त झाली पाहिजे,’’ असे म्हणतात. झोपडपट्टी हटवून नवीन वस्ती केल्यास शहराचा तो भाग निकामी अवयवासारखा होईल. गरीब वस्तीत घुसमटणाऱ्या माणसांना नव्या उमेदीने मूळ प्रवाहात आणता येईल. मुंबईतील सर्व आíकटेक्चरल स्कूल्सना एकत्र आणून धारावीच्या पुनरूत्थानाची रचना करावी, अशी त्यांची इच्छा आहे.
मात्र वास्तुकलेमधून होणारी अभिव्यक्ती आणि वास्तुरचनेच्या निर्मिती प्रक्रियेविषयीचे पुस्तकात ठिकठिकाणी विखुरलेले लेखकांचे चिंतन एकसंध असते तर अधिक परिणामकारक झाले असते. अमेरिकेतून अवघ्या जगाला भिडल्यामुळे जांभेकर यांची वास्तुकलेविषयक दृष्टी प्रगल्भ होत गेली याचा प्रत्यय वारंवार येतो. सध्याच्या काळात वास्तुकलेसमोरील आव्हाने, मागणी व बाजारपेठ यांचा परिणाम कसा होतो? तंत्रज्ञानातील प्रगती, आíथक सुबत्ता यामुळे वास्तुकला अधिक सुसंस्कृत झाली काय? जगातील विविध देशांतील समाजमन वास्तूमधून कसं व्यक्त होत आहे? यासंबंधी जांभेकराचे विस्तृत भाष्य आवश्यक होते. लेखकाला वैयक्तिक व कौटुंबिक कथनाचा विस्तार, प्रसंगांची पुनरुक्ती व काही छायाचित्रे टाळता आली असती.
वास्तुकलेसंबंधीची जाण वाढविणारी पुस्तके मराठी वाचकांच्या वाटय़ाला क्वचितच येतात. विश्वाचे अंगण हे आंदण मानून वास्तुकलेची महती उलगडून दाखविणारे हे पुस्तक वाचकांनी आवर्जून वाचले पाहिजे.
‘हे विश्वाचे अंगण – वास्तुरचनाकाराची कहाणी’ – सुधीर जांभेकर, राजहंस प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १८२, मूल्य – ३५० रुपये.