लोकसभा निवणडणुकीत देशात एनडीएचे सरकार सत्तेवर आल्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांना तुरूंगात पाठवू असे वक्तव्य भाजप नेत्या उमा भारती यांनी केले आहे.
वढेरा यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून आपली आर्थिक प्रगती साधल्याचा आरोप भारती यांनी यावेळी केला आहे. त्या म्हणाल्या की, “सोनिया गांधी यांचे जावई असल्यामुळे सर्व काँग्रेसशासित राज्यांना वढेरा यांचे भय आहे. केंद्रीय मंत्र्यांवरही वढेरा यांनी आपले दबावतंत्र वापरून सर्व नियम धाब्यावर बसवून स्वत:चा आर्थिक लाभ करून घेतला आहे. त्यामुळे देशात एनडीएची सत्ता आल्यास मी या ‘जावईबापूंना’ तुरूंगातमध्ये पाठवेनच.” असेही त्या म्हणाल्या.
तर सत्ता आल्यास कोणालाही जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाणार नाही. भाजपच्या नेतृत्वाखाली दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यावर आणि विकासाच्या दृष्टिकोनातून काम करण्यावर भर राहील असे याआधी नरेंद्र मोदींनी सांगितले होते.