* आगामी दोन महिन्यांत भारतातील विविध राज्यांमध्ये बाजरीला प्रतिक्विंटल २१००-२३०० रुपये भाव मिळणार आहे. * राजस्थान, महाराष्ट्र, हरयाना, गुजरात आणि उत्तर प्रदेश ही राज्ये बाजरी उत्पादनासाठी महत्त्वाची आहेत. बाजरी उत्पादनात तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. * तमिळनाडूमध्ये मे-जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर अशा दोन कालावधीत बाजरीचे उत्पादन घेतले जाते. * २०१४-१५ या वर्षांत देशभरातील ०.५९ हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड करण्यात आली. गतवर्षी झालेल्या उत्पादनापेक्षा यंदा ९ टक्के अधिक उत्पादन घेण्यात यश आले आहे. लागवडीसाठी विमा योजना राबविणार - केंद्र * लागवडीसाठी विमा योजना राबविण्याचा केंद्राचा विचार असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव रजनी रश्मी यांनी दिली. * रबर, चहा यांसारख्या नगदी पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. * जागतिक पातळीवर रबराचे वाढलेले महत्त्व लक्षात घेत केंद्राने रबराचे उत्पन्न वाढावे यासाठी उचललेले हे पाऊल आहे. * केंद्राच्या या योजनेमुळे रबर उत्पादनासाठी चालना मिळणार आहे.