भरधाव कंटेनरने पीकअप व्हॅनला समोरून जोरदार धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात मंगळवारी एकाच गावातील १४ जण जागीच ठार झाले. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  सोलापूर-धुळे महामार्गावर उस्मानाबाद जिल्हय़ातील चोराखळी (तालुका कळंब) गावाजवळ सायंकाळी ही दुर्घटना घडली. पीकअपमध्ये ३०-३५जण बसले होते. उपळाई (तालुका कळंब) येथील हे सर्व रहिवासी मंगळवारी कंदुरीचे जेवण करण्यासाठी गड देवधरी गावी गेले होते. तेथून परतताना औरंगाबादहून सोलापूरकडे निघालेल्या कंटेनरने पीकअपला  धडक दिली.