मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात चोळई गावच्या हद्दीत वळणावर कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून १ गंभीर तर २ किरकोळ जखमी झाले आहेत.
मयत महिलेचे नाव मीनल रामचंद्र जोशी वय वष्रे ५१ असून चालक रामचंद्र शंकर जोशी व मुलगा राहुल, सरस्वती गणपत जोशी हे तिघे जखमी झाले. हे सर्व रा. खारघर, नवी मुंबई येथील असून ते देवगडकडून मुंबईकडे आपल्या गाडीने जात असताना घाटातील एका वळणावर हा अपघात घडला. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस निरीक्षक संभाजी हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. मोकल तपास करीत आहेत.