तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या बारामतीमधील भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याने यातील सातहीजण जागीच ठार झाले आहेत.
बारामतीतील काही तरुण स्कॉर्पिओ गाडीतून तिरुपतीच्या दर्शनासाठी निघाले होते. आंध्रप्रदेशमधील कर्नुलजवळ स्कॉर्पिओला अपघात झाला व अपघातात स्कॉर्पिओतील सात तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. सागर अंकुश रसाळ, सागर बाळासाहेब रसाळ, अजित रामचंद्र रसाळ, अनिल रमेश गवळी, शेखर बापूराव गवळी, ऋषीकेष पोपट गवळी, मोहन दत्तात्रय गवळी, या सातजणांचा अपघातात मृत्यू झाला. मृत युवक देऊळगाव रसाळ, उंडवडी सुप्याचे रहिवासी होते.