९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार आहे. यापूर्वी संमेलनासाठी बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रमची निवड करण्यात आली होती. मात्र यावरुन वाद निर्माण झाल्याने विवेकानंद आश्रमाने आयोजनाचा प्रस्ताव मागे घेतला होता.

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यातील वादग्रस्त शुकदास महाराज यांच्या आश्रमामध्ये होणार होते. मात्र हिवरा आश्रमाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. १४ जानेवारी १९६५ ला शुकदास महाराज यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील हिवरा येथे विवेकानंद आश्रमाची स्थापना केली होती. या निर्णयाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध दर्शवला होता. समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी बाबांचा भंडाफोड केला होता. तेथील स्थानिक कार्यकर्ते भरत काळे यांनी हे प्रकरण समोर आणले होते. येथे संमेलन झाले तर देशभरात चुकीचा संदेश जाईल असे ‘अंनिस’चे म्हणणे होते. साहित्य संमेलन हे संस्थानिकांचे असावे असे ज्यांना वाटते, त्यांनी विवेकानंद आश्रम व शुकदास महाराजांची बदनामीची मोहीम उघडल्याचा आरोप करत विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी आयोजनाचा प्रस्ताव मागे घेतला होता.

ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
Chandrakant Patil instructs angry workers to leave the hall in maval
महायुतीच्या मेळाव्यात ‘मानापमान’ नाटय़; चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘नाराज’ कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना
Uday Samant Nagpur
“रत्नागिरी – सिंधुदुर्गवर आमचाच हक्क” – उदय सामंत
amol kolhe
आढळरावांविरोधात वीस वर्षे टोकाचा संघर्ष करणाऱ्यांचे मनोमिलन कसे होणार? खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल

सोमवारी साहित्य महामंडळा संमेलनासाठी बडोद्याची निवड केल्याचे जाहीर केले. बडोद्यातील हे चौथे साहित्य संमेलन असेल. यापूर्वी १९०१ मध्ये सातवे संमेलन, १९२१ मध्ये अकरावे संमेलन आणि १९३४ मध्ये विसावे संमेलन बडोद्यात झाले होते.