मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर गुरूवारी सकाळी एका ट्रकने पेट घेतल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे एक्सप्रेस मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. खंडाळ्यानजीक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. सुताची वाहतूक करणाऱ्या या ट्रकने खंडाळ्याजवळ अचानकपणे पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही आग शॉकसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत असून, साडेनऊ टन सुताचा साठा असल्याने आग वेगाने पसरली आणि ट्रक जळून खाक झाला आहे. मात्र, अद्यापपर्यंत अग्निशमन दलाची एकही गाडी या ठिकाणी दाखल झाली नसून, वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी किती वेळ लागेल याची, कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…