मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी आलेल्या गावांतील शेतकऱ्यांचे ६७ टक्के वीजबिल राज्य शासनाने भरावे असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी, रब्बीच्या दुष्काळातही केंद्राकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी निवडणुकांची तयारी आणि दुष्काळी परिस्थिती या विषयांवर चर्चा करण्यासाठी पुणे शहर व जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक हिंजवडी येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत सरकारने कोणकोणते निर्णय घेतले आहेत त्याची माहिती दिली.
गुरांसाठी चाऱ्याच्या छावण्या, तसेच रेल्वेचे टँकर लावून पाणी आणण्याची योजना आखण्यात आली असून रब्बी हंगामात पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी आलेल्या गावांतील शेतकऱ्यांचे ६७ टक्के वीजबिल सरकारने भरावे असाही निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे असे सांगून दुष्काळात धान्य कमी पडणार नाहीअसेही पवार म्हणाले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















