मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माच्या समावेशासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री
- संगमनेरजवळ पेट्रोलपंपावर ६५ हजारांची लूट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- तरुणीचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप
- सार्वजनिक बांधकाम विभागात पाच हजार कोटींचा घोटाळा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत दहशतवादी अजमल कसाब याला आज (बुधवार) सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. सरकारी वकील उज्वल निकम यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
दहशदवादी अजमल कसाबचा दयेचा अर्ज राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी फेटाळला होता. महाराष्ट्रात नागपूर आणि येरवडा या दोनच तुरुंगामध्ये फाशी देण्याची यंत्रणा आहे. त्यामुळे कसाबला दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या अर्थर रोड तुरूंगातून येरवडा कारागृहात हलवण्यात आले होते. आणि आज (बुधवार) पहाटे त्याला फाशी देण्यात आली.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोक मारले गेले होते. कसाबला विशेष न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातर्फे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
मुंबईवरील हल्ला हा देशावरील हल्ला होता.
त्या हल्ल्याला मुंबईच्या बहादूर अधिका-यांनी, पोलिस शिपायांनी चोख उत्तर दिले. आज कसाबला फाशी झाल्याने या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ख-या अर्थाने श्रध्दांजली मिळाली असल्याचे राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी म्हटले आहे.
भारताने संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण करूनच कसाबला फाशी दिली असल्याने भारतात कायद्याचे राज्य असल्याचे सिध्द झाले आहे, असंही ते म्हणाले.



















माझ्या माहिती प्रमाणे एखाद्या विदेशी कैद्याला जर फाशी द्यायची असेल तर त्याच्या वकीलास सूचना दिली जाते; तसेच तो ज्या देशाचा आहे त्या देशाच्या दूतावासास सूचना दिली जाते अमुक – अमुक तारखेस फाशी द्यायची आहे. असे झाले आहे का? त्याच प्रमाणे काल – परवा पर्यंत कॉंग्रेस आणि सरकार जे सांगत होते की कसाबाच्या आधी १७ जण फासावर जायचे बाकी आहेत क्रमा नुसार कसाबला फासावर दिले जाईल. तसेच राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळून लावल्यावर एका न्यायाधीशाची नेमणूक करून त्यांच्या आदेशानुसार फाशी दिली जाते, कसाबच्या बाबतीत असे झाले का?
तर मग कॉंग्रेसला अफजल गुरुचे प्रकरण पण पूर्ण करून टाकावे.
मागील काही दिवसांच्या बातम्या नुसार कसाब देण्गुने आजारी होता; आणि त्याचे उपचार जेल मध्येच चालू होते. जिथे यश चोप्राजी सारखे सर्व सोयीनी सुसज्ज हॉस्पिटल मध्ये उपचार करून दगावतात तर आम्ही हा विश्वास ठेवावा की कसाब जेल मध्ये उपचार करून पूर्ण बरा झाला. खरे तर तो आजाराने मरण पावला आहे.
फार छान प्रतिक्रिया आहे तुमची, आणि डेंगू चा संशय पण योग्य वाटतो. परंतु भारतीय प्रसारमाध्यमे हि कधी कुठल्या गोष्टीची शहानिशा करतील हि अपेक्षाच आपण करू शकत नाही. नुसतं अफझल गुरूच नाही तर मालेगाव बॉम्बस्फोटातील पांडे, पुरोहित आणि ठाकूर ह्यानाही फाशी द्यायला पाहिजे. त्यांनीही आहेक निष्पाप लोकांचे जीव घेतलेत. न्याय संस्थेनी साऱ्यांना एकाच परिमाण वापरायला पाहिजे.