लोकसभेच्या रणमैदानात राज्यभर काँग्रेसविरोधी लाट असताना नांदेड व लगतच्या िहगोलीत मात्र काँग्रेसने यशाचा झेंडा रोवला. या यशाने कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असतानाच काँग्रेसमधील काहींनी विधानसभेत बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला. या पाश्र्वभूमीवर मागील वेळेप्रमाणेच यश राखण्यास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची चांगलीच कसोटी लागणार आहे. मतांचे मोठय़ा प्रमाणात विभाजन अटळ असल्याने काँग्रेससह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आदी पक्षांच्या प्रमुख उमेदवारांची विजयासाठी दमछाक होत आहे.
जिल्ह्यात मागील वेळी ९ पकी ७ जागा काँग्रेस, तर २ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. लोकसभेच्या मैदानात मुखेडवगळता सर्वच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली. मात्र, युतीचा घटस्फोट व आघाडीत बिघाडी यामुळे काही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागल्यास आश्चर्य वाटू नये, असे चित्र आहे. अशा वेळी काही जागा पदरात पाडून घेण्याची विरोधी पक्षांपुढे संधी आहे, तर काँग्रेस श्रेष्ठींकडे भविष्यातील राजकीय पुनर्वसनासाठी जास्तीत-जास्त उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापुढे आहे.
माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, भोकरचे उपनगराध्यक्ष नागनाथ घिसेवाड आदींनी भाजपत, तर माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काही मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार आहेत.
किनवट
आंध्र-विदर्भ सीमेवरील, एकेकाळी नक्षलवाद्यांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या या मतदारसंघात दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. सूर्यकांता पाटील समर्थक आमदार प्रदीप नाईक यांनी दोन निवडणुकात यश मिळविले. पण आता सूर्यकांता पाटील भाजपमध्ये गेल्याने त्यांचे काही समर्थक नाईक यांच्यापासून दुरावले आहेत. दहा वर्षांतील चित्रही बरेच बदलले आहे. कधी भाजप, तर कधी काँग्रेसचा लोकप्रतिनिधी देणाऱ्या या मतदारसंघात मागील निवडणुकीत भाकपचे सुभाष जाधव मोठय़ा मतांच्या फरकाने विजयी झाले. राष्ट्रवादीने नाईक यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे डॉ. बी. डी. चव्हाण, मनसेतर्फे धनराज पवार आदी िरगणात आहेत. एकूण २९ उमेदवार आहेत. आदिवासी व बंजारा समाजाचे येथे मोठे प्राबल्य आहे.
हदगाव
१५ वष्रे शिवसेनेच्या आमदाराला विजयी करणाऱ्या या मतदारसंघाने मागील निवडणुकीत काँग्रेसच्या माधवराव पाटील जवळगावकर यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात १९७८ चाअपवाद वगळता काँग्रेसची पाठराखण केली. १५ वष्रे या भागाचे नेतृत्व करणाऱ्या सुभाष वानखेडे यांनी भाजपत प्रवेश केल्याने काँग्रेसच्या उमेदवाराला दिलासा मिळाला. काँग्रेसने माधवराव पवार यांना पुन्हा संधी दिली. त्यांच्यासमोर शिवसेनेने नागेश पाटील आष्टीकर, भाजपने लता कदम, बसपने जाकेर चाऊस, राष्ट्रवादीने प्रताप देशमुख यांना िरगणात उतरविले. येथे ३० उमेदवार आहेत.
नांदेड दक्षिण
मागील वेळी ओमप्रकाश पोकर्णा विजयी झाले होते. त्या वेळी मुस्लीम समाजाने काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. आता या मतदारसंघात राज्यात सर्वाधिक म्हणजे ८५ उमेदवार िरगणात आहेत. मुस्लीम समाजाची मते निर्णायक ठरूशकतात. सेनेने हेमंत पाटील यांना पुन्हा संधी दिली. महापालिकेचे माजी सभापती दिलीप कंदकुत्रे यांनी अशोक चव्हाणांची साथ सोडून भाजपशी घरोबा करून उमेदवारी मिळविली. महापालिका निवडणुकीत राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘एमआयएम’नेही येथे उमेदवार दिला. बसपतर्फे काँग्रेसमधून आलेले अनवर जावेद नशीब आजमावत आहेत.
नांदेड उत्तर
स्वच्छ प्रतिमेचा राजकारणी अशी ओळख असणारे डी. पी. सावंत मागील निवडणुकीत येथून विजयी झाले. माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आधी शिवसेना व नंतर भाजपत प्रवेश करून उमेदवारी मिळविली. राष्ट्रवादीनेही डॉ. सुनील कदम, सेनेने मििलद देशमुख, मनसेने दिलीप ठाकूर यांच्या रूपाने आव्हान उभे केले आहे. बसपतर्फे सुरेश गायकवाड िरगणात आहेत. येथे शिवसेनेचे १० नगरसेवक आहेत. पूर्वी काही भाग मुदखेड मतदारसंघात होता. तरोडा व ग्रामीण भागात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. कोणतेही गट-तट न मानणाऱ्या, सर्वाशी सलोखा ठेवणाऱ्या सावंत यांच्यापुढे गड राखण्याचे आव्हान आहे.
भोकर
काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघावर गोरठेकर व चव्हाण कुटुंबीयांची पकड आहे. १९९० व १९९५ च्या निवडणुकीत डॉ. माधवराव किन्हाळकर विजयी झाले. शंकरराव चव्हाण व बाबासाहेब गोरठेकर यांनी अनेक वेळा येथून प्रतिनिधित्व केले. पूर्वीचा धर्माबाद व आता भोकर मतदारसंघातून मागील निवडणुकीत अशोक चव्हाण एक लाखापेक्षा अधिक मताधिक्क्य़ाने विजयी झाले होते. मुदखेड, भोकर नगरपालिका, अर्धापूर नगरपंचायत, जि. प. व पंचायत समिती, तसेच छोटय़ा-मोठय़ा सहकारी संस्थांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर काँग्रेसने अमिता चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात भाजपकडून माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, राष्ट्रवादीतर्फे धर्मराज देशमुख, शिवसेनेकडून बबन बारसे यांच्यासह अन्य प्रमुख ७१ उमेदवार िरगणात आहेत. काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढाई असल्याने अनेक पदाधिकारी व आमदार अमर राजूरकर येथे तळ ठोकून आहेत. अशोक चव्हाण यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी व्यूहचना केली आहे.
कंधार
स्वातंत्र्यानंतर सतत तीन वेळा शेकापने विजयाचा झेंडा रोवलेल्या या मतदारसंघात १९८० च्या निवडणुकीत काँग्रेसचे ईश्वरराव भोसीकर विजयी झाले. त्यानंतर १९८५ व १९९० मध्ये शेकापने विजय मिळविला. १९९५ मध्ये पहिल्यांदाच या मतदारसंघावर भगवा फडकला. १९९९ मध्ये शिवसेनेने विजय मिळवला. २००४ मध्ये अपक्ष म्हणून प्रताप पाटील चिखलीकर विजयी झाले. मागील निवडणुकीत मात्र अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला. चिखलीकर आता सेनेचा भगवा झेंडा घेऊन मैदानात उतरले आहेत. विद्यमान आमदार शंकरअण्णा धोंडगे, काँग्रेसतर्फे डॉ. श्याम तेलंग, भाजपतर्फे डॉ. मुक्तेश्वर धोंडगे, मनसेतर्फे माजी आमदार रोहिदास चव्हाण असे २२ उमेदवार िरगणात आहेत.
देगलूर-बिलोली
आंध्र-कर्नाटक सीमेवरील देगलूर-बिलोली मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहिले. जनता दलाचे गंगाधर पटने येथून एकदा विजयी झाले होते. पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला. मागील निवडणुकीत रावसाहेब अंतापूरकर यांचा विजय झाला. काँग्रेसने त्यांना पुन्हा संधी दिली. राष्ट्रवादीतर्फे मारोती वाडेकर, सेनेकडून माजी आमदार सुभाष साबणे, पुण्यात उद्योग करणाऱ्या भीमराव क्षीरसागर यांना भाजपने िरगणात उतरविले. एकूण ३५ उमेदवार मैदानात आहेत.
मुखेड
पूर्वी राखीव असलेल्या या मतदारसंघावर काँग्रेसच्या उमेदवाराने अनेकदा विजय मिळवला. १९९५ मध्ये युतीची लाट असताना काँग्रेसने विजय राखला. १९९९ मध्ये शिवसेनेने, तर २००४ मध्ये मतदारसंघ खुला झाल्यानंतर काँग्रेसचे हणमंत पाटील बेटमोगरेकर विजयी झाले. आता बेटमोगरेकर यांच्यासह गोिवद राठोड (भाजप), व्यंकट लोहबंदे (शिवसेना), डॉ. व्यंकट सुभेदार (राष्ट्रवादी) या प्रमुखांसह ३१ उमेदवार िरगणात आहेत.
नायगाव
पुनर्रचनेनंतर नायगाव नवीन मतदारसंघ झाला. मागील निवडणुकीत अपक्ष लढणाऱ्या वसंत चव्हाण यांनी बापूसाहेब गोरठेकर यांचा पराभव केला. विजयानंतर काँग्रेसचे सहयोगी सदस्य मिळवणाऱ्या वसंत चव्हाण यांना पक्षाने पुन्हा संधी दिली. राष्ट्रवादीने बापूसाहेब गोरठेकर, भाजपने राजेश पवार, शिवसेनेने बाबाराव एंबडवार यांना मैदानात उतरवले. मत विभाजनात कोण बाजी मारतो, याचीच खरी उत्सुकता आहे.