अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दौंड- मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी दिली आहे. २४७ किलोमीटरचा हा प्रकल्प २०२१- २२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

अनेक वर्षांपासून दौंड- मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी होत होती. इंग्रजांच्या काळात हा मार्ग बांधला असून व्यस्त मार्गामुळे रेल्वे गाड्यांची संख्या वाढवता येत नव्हती.  तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली होती. गेल्या वर्षी रेल्वेने या कामाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी टेंडर मागवले होते. मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी देण्यात आली. दौंड- मनमाड या २४७ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुहेरीकरण होणार असून या कामाासाठी सुमारे २,३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे रोजगारालाही चालना मिळेल असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

proposal for widening of uran to panvel road
उरण-पनवेल मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव, नवघर फाटा ते बोकडवीरा पोलीस चौकीपर्यंत चौपदरी मार्ग
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा
Passengers are monitored through cameras based on AI technology in Pune railway station
सावधान! रेल्वे प्रवाशांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; संशयास्पद हालचाली टिपल्या जाताहेत

देशातील उत्तर- दक्षिण भाग जोडणाऱ्या या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण होत असल्याने प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीला फायदा होणार आहे. याशिवाय शिर्डी आणि शनि- शिंगणापूरला येणाऱ्या भाविकांना याचा फायदा होणार आहे.  अहमदनगर हे लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख तळ असल्याने लष्करालाही याचा लाभ होणार आहे.

मुंबई- चेन्नई मार्गावर भिगवण- मोहोळ आणि होटगी- गुलबर्गा या मार्गाच्या दुहेरीकरणाचे कामही सुरु असून हे तिन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यावर दौंड- मनमाड मार्गावरील रेल्वे वाहतूक वाढेल आणि भविष्यात अहमदनगरचे महत्त्व वाढेल असे रेल्वेचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.