मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
शहरातील तीन लकडी प्राथमिक शाळेतील सहावीच्या वर्गाचा दरवाजा अज्ञात व्यक्तींनी पेटविल्याने दरवाज्यासह वर्गात असलेली कागदपत्रे जळून भस्मसात झाली. या वर्गखोली लगतच्या कृषी कार्यालयातील कागदपत्रेही जाळण्याचा प्रयत्न झाला. एकूणच या प्रकाराबद्दल संशय व्यक्त केला जात असून शिक्षकांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.
जिल्हा परिषदेची तीन लकडी प्राथमिक शाळा नगरपालिकेच्या इमारतीत भरते. त्या इमारतीत कृषी खात्याचे कृषी अॅग्रो सेंटर आहे. सातवीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळेत विजेची कोणतीही सोय नसल्याने इमारतीत अंधाराचे साम्राज्य असते. सोमवारी रात्रीच्या सुमारास कृषी विभागासह वर्ग खोलीला कोणीतरी आग लावली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. आगीत वर्गातील महत्त्वाचे दस्तावेज व लाकडी कपाड जळून खाक झाले. ही बाब सकाळी शिक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















