औरंगाबादमधील कन्नडमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. कन्नडमधील सावरगावमध्ये ही घटना घडली आहे. शाळेला सुट्टी असल्याने आदर्श वसाहतीमधील चार मुले सावरगाव शिवारात पोहोयला गेली होती. यातील तीन मुले नववीमध्ये, तर एक मुलगा १२ मध्ये शिकत होता. संध्याकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. दिवाळीच्या पूर्वसंधेला घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.