पुण्याच्या चिंतन ग्रुपच्या वतीने एड्स, कुपोषण, लोकसंख्यावाढ व गुटखा याविरुद्ध जनजागरण करणाऱ्या ‘सेवा प्रबोधिनी’ या संस्थेतर्फे आयोजित निबंध स्पर्धेत येथील एचपीटी व आरवायके महाविद्यालयाचा विद्यार्थी गणेश जाधव हा महाविद्यालयीन गटात प्रथम आला.  ‘संवादाची बदलती साधने’ हा स्पर्धेसाठी विषय होता. याशिवाय पुणे शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘आजी-आजोबा आणि कुटुंब’ हा विषय निबंध स्पर्धेसाठी होता. त्यात सरस्वती विद्यालयाची श्रद्धाली जगताप प्रथम आली. पुणे येथे १० मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.