मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
आधार कार्ड किंवा कार्ड क्रमांक नसले तरी राज्य सरकारच्या योजनांपासून कोणालाही वंचित ठेवले जाणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सांगितले.
राज्यात आधार कार्ड नोंदणीच्या कामामध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे, याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, विलास लांडे, लक्ष्मण जगताप, महादेव बाबर, माधुरी मिसाळ, पंकजा मुंडे-पालवे यांनी लक्षवेधी सूचना मांडून या प्रकरणी सरकारने त्वरित हस्तक्षेप करून उपाययोजना करावी, अशी मागणी केली.
या लक्षवेधीला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. नागरिकांना आधार कार्ड देण्याचा केंद्राचा निर्णय क्रांतिकारक आहे. या योजनेत सप्टेंबर २०१० पासून नोंदणी सुरू झालेली असून जानेवारी २०१२ पर्यंत २० कोटी नागरिकांची नोंदणी झाली आहे. मे २०१२पासून योजनेच्य दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. यातील अडचणी कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून त्यात निश्चित सुधारणा होईल. नोंदणीसाठी राज्यात २२०० मशिन्स आहेत. त्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आधार कार्ड किंवा कार्ड क्रमांक नसला तरी राज्य सरकारच्या योजनांपासून कोणालाही वंचित ठेवले जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आधार कार्ड नोंदणी केंद्रांची संख्या वाढविण्यात येत आहे. या कामामध्ये टपाल खाते, बँकांची मदत घेतली जात आहे. योजनेचे राज्यात ३४ टक्के काम झाले आहे. मुंबई, पुणे व नागपूर अशा शहरी भागात ४०४ नोंदणी किट्स कार्यरत आहेत. राज्यात दोन हजार किट्स उपलब्ध करून देण्याच्या सूचना 'महाऑनलाईन' या संस्थेस दिलेल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँका व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठी काम करणाऱ्या संस्थांनादेखील नोंदणीचे काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्य़ात ८३ टक्के, यवतमाळात २१ टक्के, गडचिरोली जिल्ह्य़ात २२ टक्के लोकांची नोंदणी झाली आहे. २०१३ पर्यंत नोंदणीचे काम पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



















दिल्लीहून आलेले फर्मान बिनडोकपणे खाली कसे पास करायचे हे महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकार्यांपासून् न शिकण्यासारखे आहे.सद्यः ज्यांना निवृत्तिवेतन सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय बँकातून मिळते त्यांनाही सांगण्यात आलेले आहे की पुढिल वर्षापासू्न आधार कार्ड असेल तरच निवृत्ति वेतन मिळेल. या फर्मानाला काय् म्हणावे?आमच्या विभागात् आधार कार्ड देणे पाच् सहा महिने बंद केले आहे. आधार कार्ड मिळवून देणे हे आमचे काम् नाही असे फर्मानवाले सांगतात