औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूरनजीक सुखमनी जिनिंगला आग लागून सुमारे ३ हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. यात सव्वाकोटीपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सुखमनी कापूस जिनिंगला सीसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कापसाच्या गंजीला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर अग्निशामक दलाच्या पथकांना दूरध्वनी केल्यानंतर िहगोली व वसमत येथील अग्निशामक दलाच्या गाडय़ा घटनास्थळी सायंकाळी पाचच्या सुमारास पोहोचल्या. आगीत ३ हजार क्विंटल कापूस जळाला. सुमारे सव्वाकोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे कारण समजले नाही.
सुरुवातीला गंजीतून धूर निघत असल्याचे काम करणाऱ्या मजुरांनी सांगितल्यानंतर जिनिंगमधील उपस्थित सर्व कामगारांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, िहगोली, वसमतवरून आलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.