निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी हे तिन्ही तालुके टंचाईग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने तहसील कार्यालयास टाळे ठोकून दरवाजाला काळे फासण्यात आले.
सरकारने राज्यातील १२३ तालुक्यांत टंचाईसदृश स्थिती जाहीर केली. जिल्हय़ातील लातूर, रेणापूर, निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तालुक्यांत सरासरी ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडूनही हे तालुके वगळण्यात आले. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी भाजप प्रदेश सरचिटणीस संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष संजय दोरवे, रज्जाक रक्साळे, मुरलीधर अन्सुळे, बळीराम पाटील आदी कार्यकत्रे उपस्थित होते.