महाराष्ट्राला लाभलेली उत्कृष्ट वक्तृत्वाची परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी आणि कानाकोपऱ्यांत दडलेल्या तरुण वक्त्यांना शोधून त्यांच्या भाषण कौशल्याला वाव देण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेची प्राथमिक फेरी आज, शुक्रवारी गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे होणार आहे. दुपारी दोन वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाईस व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने होणारी ‘वक्ता दशसहस्रेषु’ ही वक्तृत्व स्पर्धा जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर होत आहे. मालेगाव, कळवण, चांदोरी, सिन्नर, सटाणा, देवळा आदी ठिकाणाहून १४ महाविद्यालयातून २६ स्पर्धक तर शहर परिसरातील १६ विद्यालयांमधून २८ स्पर्धक असे एकूण ५४ स्पर्धेत सहभागी होतील.
अधिक माहितीसाठी संपर्क :
वंदन चंद्रात्रे (९४२२२ ४५०६५).