मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बुधवारी झालेल्या चर्चेनंतर राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेण्याची घोषणा केली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत उपस्थित होते. दोन हजार रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणे, निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यासाठी अनुदान, अनुकंपा धर्तीवर नियुक्त्या, २४ वर्षे आश्वासित प्रगती योजना अशा मागण्यांवर यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात योग्य त्या सूचना विभागाला देण्यात येतील, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले.