काँग्रेसचे नेते नारायण राणे, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या मुहूर्ताची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच लवकरच मोठा ‘राजकीय भूकंप’ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील १२ ते १६ खासदार भाजपच्या गळाला लागले असल्याचा दावा राज्यातील भाजप नेत्यांनी केला आहे. त्यातील अनेक खासदारांची भाजपच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने या संबंधीचे वृत्त दिले आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. देशात ३५० हून अधिक खासदार निवडून आणण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. ‘भाजपमध्ये आपले स्वागत आहे’ असे खुले निमंत्रणही भाजपच्या नेत्यांकडून इतर पक्षांच्या खासदारांना दिले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप नेते चर्चेतील नेत्यांचे अधून-मधून ‘स्वागत’ही करताना दिसत आहेत. ‘घुसमट’ होत असलेल्या इतर पक्षांच्या नेत्यांसाठी भाजपचे दरवाजे नेहमीच खुले आहेत, असे एका भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
Chandrashekhar Bawankule,
“अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?
Sanjay Kokate of Shiv Sena Shinde group is join NCP Sharad Pawar group
शिवसेना शिंदे गटाचे संजय कोकाटे राष्ट्रवादी शरद पवार गटात

पक्ष किंवा नेतृत्वावर जे लोक नाखूश आहेत. ज्यांना भाजपत प्रवेश करण्याची इच्छा आहे त्यांचे स्वागतच आहे. त्यांच्यासाठी भाजपची दारे खुली आहेत, असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून त्यांच्यात एक बैठकही झाल्याचे वृत्त नुकतेच इंडियन एक्स्प्रेसने दिले होते. त्यामुळे भंडारी यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

राज्यातील इतर पक्षांच्या जवळपास १५ आमदारांची भाजपशी बोलणी सुरू आहेत, असा दावा पक्षाचे सरचिटणीस आणि पिंपरी-चिंचवडचे नेते सारंग कामटेकर यांनी केला आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत, असेही ते म्हणाले. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांचे १२ ते १६ खासदार भाजपच्या गळाला लागल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसेल, असे राजकीय विश्लेषक माधव सहस्रबुद्धे यांनी म्हटले आहे. राज्यातील ४८ पैकी ३५ जागांवर शिवसेना उमेदवार उभे करण्यात येतील, असे नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यात युती झाल्यास २५ पेक्षा जास्त जागा शिवसेनेसाठी सोडणार नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे, असेही त्यांनी सांगितले.