कारागृहांच्या परिसरात १५० मीटपर्यंतच बांधकामे करण्यास र्निबध घालण्यासाठी पावले टाकली जातील आणि सध्याची ५०० मीटरची मर्यादा शिथिल केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. या संदर्भात प्रणिती िशदे यांनी लक्षवेधी मांडली होती. मुंबईसारख्या शहरात ऑर्थररोड व अन्य कारागृहे भरवस्तीत आहेत. तेथे बांधकामे रखडली आहेत. सध्या कारागृहापासून ५०० मीटरच्या परिसरात कोणत्याही बांधकामांसाठी र्निबध आहेत.