चिपळूण वालोपे येथे बोरीवली साखरपा एसटीला बुधवारी पहाटे पावणेपाच वाजता भीषण अपघात होऊन लक्ष्मण धोंडू नारकर (वय ४३, रा. बाईत चाळ अंधेरी, मुंबई) हे मृत्युमुखी पडले तर १५ प्रवासी जखमी झाले.
जखमींमध्ये सुजाता रामचंद्र परशुराम (वय २३, रा. संगमेश्वर), सर्वेश संभाजी मोवळे (१३), सुंदरा प्रकाश मोरे (५०, रा. अंधेरी), अपर्णा अनंत नाखरेकर (२६, रा. बोरीवली),  प्रकाश शांताराम सावंत (४५, रा. मालाड), स्वप्नाली संतोष तावडे (३२, रा. शिपोशी), सुनंदा शिवराम अडवळ (६४, रा. विलेपार्ले),दिपक रावजी अडवल (४५, रा. गोरेगांव), संतोष दत्ताराम तावडे (४५, रा. सांताक्रूझ),  स्मिता संभाजी मोवळे (३७, रा. गोरेगाव) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर कामथे येथे  रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरी रस्त्यावर इन्सुली खामदेव येथे पहाटे एक वाजता झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. कुडाळ येथून बांदा येथे जाणारी स्विप्ट कार कोसळून हा अपघात झाला. जमीर दाऊद मुल्ला (३०) आणि नेल्सन बस्त्यावर फर्नाडिस (२५) ही ठार झालेल्यांची नावे आहेत. ते बांदा आणि सातार्ड येथील रहिवासी होते. तर सॉल्विन पेद्रु रॉड्रिक्स हा हे जखमी प्रवाशाचे नाव आहे.