मिरज तालुक्यातील मालगांव येथील पांडुरंग गोिवद माळी या १११ वर्ष वयाच्या वृद्ध इसमाचे शुक्रवारी राहत्या घरी निधन झाले. शेतकरी असणाऱ्या पांडुरंग माळी यांनी आयुष्यभर शेती व्यवसाय केला. गेली १० वर्षांपासून त्यांनी शेती व्यवसायातून निवृत्ती घेतली होती. या पूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून त्यांचा सांभाळ पुतण्या तानाजी माळी यांनी केला होता. शाकाहारी जेवण हे त्यांच्या दीर्घायुष्याचे गमक असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.