मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या बोलण्याप्रमाणे वागतात असा टोमणा राज ठाकरेंनी मारला आहे. राज ठाकरे यांनी नाशकात मनसे वीज कामगार संघटनेच्या अधिवेशनाच्या उद्घाटनाला उपस्थिती लावली होती, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवण्याचा घाट घातला असून याच्याशी राज्यातील सत्ताधाऱ्यांना काही घेणं देणं नाही,असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मोदी आणि शाह यांनी उठ म्हटलं की मुख्यमंत्री उठतात, बस म्हटलं की बसतात असा टोलाही राज यांनी हाणला.   पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांपासून महाराष्ट्राला मुक्त करा असे नरेंद्र मोदी सांगायचे. आता तेच मोदी शऱद पवारांसोबत बसतात, त्यांचे कौतुक करतात याकडे लक्ष वेधत ठाकरेंनी भाजपाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. नाशिकमध्ये आम्ही राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा घेतला होता त्यावेळी आमच्यावर टीका झाली अशी आठवणही त्यांनी करुन दिली.